राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते. जयंत पाटील […]
टॅग: BJP
नारायण राणेंचा मोठा दावा : जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी झाली होती; गद्दारी करून सरकार स्थापन
रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं […]
भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन
राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यांच्याकडे कोटा उत्तर महापालिका […]
मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]
ED आणि CBI ची तुलना कुत्र्यांशी, संजय राऊत यांनी ट्विट केलं व्यंगचित्र
महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]
चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार
सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ […]
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का – देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत, असं ते म्हणाले आहेत. न्यायालयालाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे […]
कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं- अजित पवार
कराड : कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाहण्याचं […]
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही; पण बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता : संजय राऊत
मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणले कि, […]
भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे
औरंगाबाद : भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका […]









