अमरावती : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन […]
अमरावती
भयंकर! २२ दिवसांच्या बाळावर नातेवाईकांकडून अघोरी उपचार, पोटावर दिले गरम विळ्याचे ६५ चटके
अमरावती : उपचार म्हणून तान्ह्याबाळाला चटके दिल्याची संतापजनक घटना अमरावतीतून समोर आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील ही एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. बाळाच्या कुटुंबियांनी घरगुती उपाय म्हणून विळा गरम करून त्याच्या पोटावर ६५ वेळा डाग दिले. या उपचाराने बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा होऊन त्याची प्रकृती अधिक बिघडली. सिमोरी गावातील रहिवाशी बेबी […]
मोठी बातमी: नवनीत राणा यांना कोर्टाची नोटीस, २८ फेब्रुवारीला हजर होण्याचे आदेश
अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी कोर्टाने नोटिस बजावली आहे. नवनीत राणा यांनी एका भाषणात ओवैसी यांना आव्हान देत धमकी दिली होती, आणि त्यानुसार कोर्टाने त्यांना २८ फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत राणा २०१९ मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक आदींनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन सदर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांना गुणात्मक उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन माजी मुख्य […]
अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे […]
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा, मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार […]
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : वर्धा – ७.१८ टक्के अकोला – ७.१७ टक्के अमरावती -६.३४ टक्के बुलढाणा – ६.६१ टक्के […]
शासनाचे जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमरावती : राज्य शासन ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे. शासन जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडीत प्रदीप […]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरणार
अमरावती : हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विम्याचा लाभ दिला जाणार असून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासन भरणार आहे. या योजनेचा विभागातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे […]
अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट तयार करण्याचा निर्णय
मुंबई : राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रीया करणे […]