बीड : बीड जिल्हयाच्या विकासासाठी मी स्वत: अर्थमंत्री म्हणून अधिकाधिक निधी देत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत जिल्हयाचा 575 कोटी रुपयांचा (सर्वसाधारण) आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश […]
बीड
तुझ्या जिद्दीला सलाम! अजित पवार यांच्याकडून वैभवी संतोष देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गुण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीने मिळविलेल्या यशाने तिच्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयम, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचे सांगून तिच्या यशाने महाराष्ट्राला आनंद […]
वाल्मीक कराडनेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आदेश दिले, ‘सीआयडी’ने आरोपपत्रात केले अनेक धक्कादायक खुलासे
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ‘सीआयडी’ने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा वाल्मीक कराडच सूत्रधार होता व अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून देशमुख यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा ‘सीआयडी’द्वारे तपास […]
मोरांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणार – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई : बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी ‘ग्लॅरिसिडीया’ वनस्पती नष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. मंत्रालय येथे आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का) येथील विविध प्रश्न व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश […]
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र […]
बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर
बीड : बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध […]
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, चार-पाच जणांनी हात पाय धरून लावले सलाईन; म्हणाले, सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे […]
हसावं कि रडावं, एसटी स्थानकात येताच सीट पकडण्याची घाई, विद्यार्थी खिडकीतून शिरायला चढला, चौकट निसटली अन्…
बीड : बसमध्ये धक्का लागणे, गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधी समजतही नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. […]
पंकजा मुंडेंचे सरकारला साकडं, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, मायबाप सरकारने प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनांकडे गांभीर्याने पहावे…
मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागणी विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक […]
सरकार गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न… मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी […]