मुंबई : रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री शिंदे […]
रत्नागिरी
माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, कडवट शिवसैनिक म्हणून होती ओळख…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांचे रत्नागिरी येथे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत आप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांच्याकडून शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी […]
किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
अलिबाग : किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते. बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत […]
दुर्दैवी घटना! धबधब्यात आंघोळ करणं जीवावर बेतलं, तरुणाचा बुडून मृत्यू
रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात धबधब्यावर जाताना पर्यटकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही धोका न पत्करता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणे तसेच स्थानिकांच्या सूचनांचे पालन करणे हे आवश्यक आहे. कोकणात लांजा येथे धबधब्यावर अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्या कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]
अणूस्कुरा घाटात दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडू लागले आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या अणूस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला आहे. राजापुरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद […]
भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात!
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या […]
शासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर – पालकमंत्री उदय सामंत
रायगड(जिमाका)दि.१३ : रायगड जिल्हा प्रशासन गतीमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून […]
हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी […]
रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वेमार्फत शीतगृह उभारणार
मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक […]
रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय […]