छत्तीसगड : छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर पती/पत्नी कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या जोडीदारावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावत असतील तर ते क्रौर्यच ठरेल. पतीला न सांगता पत्नीने आपल्या मुलीच्या लग्नासाठीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले तर तेही मानसिक क्रौर्यच ठरेल, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.
बिलासपूरमधील न्यायालयाने क्रूरता आणि त्याग या कारणास्तव व्यक्तीच्या याचिकेवर घटस्फोट देण्यास नकार दिला होता. बिलासपूरमधील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्या एका पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि एनके चंद्रवंशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.
न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले कि, “हे उघड आहे की, विवाहबाह्य संबंध असल्याचे चारित्र्याशी संबंधित आरोप सहन करणे कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशकारक आहे. परंतु विधानात विसंगत आणि केवळ विवाहबाह्य संबंधाचा आरोप पत्नीने पतीवर अनावधानाने लावला आहे, हे निश्चितच आहे. मात्र, यामुळे समाजातील व्यक्तीच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे ते मानसिक क्रौर्यच ठरेल.” या महिलेने पतीवर लावलेल्या विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले. कारण या महिलेने बिलासपूरमधील कौटुंबिक न्यायालयात केलेली विधाने आणि उच्च न्यायालयात केलेली विधाने विसंगत होती, त्यात एकवाक्यता नव्हती.
पतीच्या अर्जानुसार, 31 जानेवारी 1986 रोजी त्यांचे लग्न झाले होते आणि 15 सप्टेंबर 2011 रोजी पत्नी वेगळे राहू लागली. पतीने आपल्या याचिकेत आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने विविध लोकांकडून सुमारे 10 ते 12 लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज मिळवण्यासाठी पत्नीने सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचा दावाही त्यांनी केला होता, जे या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी केले होते. आपल्या केसला पुष्टी देण्यासाठी, पतीने आपल्या मुलाची आणि मुलीची तपासणी केली, मुलांनी साक्ष दिली की त्यांच्या आईने अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या आजी अनेकदा त्यांच्या आईकडे आर्थिक मदत मागतात. आणखी एका व्यक्तीची साक्ष घेण्यात आली, ज्याने त्याच्या पत्नीला 25,000 रुपये कर्ज दिले होते.
दुसरीकडे, पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. तिने पुढे आरोप केला की, या अफेअरमुळे तिच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले होते. कोर्टाने प्रतिस्पर्ध्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे नोंदवले की मुलांनी वडिलांच्या आईविरुद्धच्या दाव्याचे समर्थन केले होते. मुलांनी आईच्या विरोधात अशा वस्तुस्थितीचे समर्थन केले की तिने तिच्या पतीच्या नकळत मुलीच्या लग्नाची सुरक्षितता म्हणून ठेवलेले दागिने गहाण ठेवले आणि कर्जदाराकडून रक्कम मिळवली. मुलीच्या लग्नासाठी असलेले दागिने गहाण ठेवल्याने नक्कीच भीती निर्माण होईल आणि वडिलांच्या मनावर आर्थिक दबाव निर्माण होईल, कारण लग्नाच्या वेळी मुलीला दागिन्यांसह सादर करण्याचे समाजात असलेले कठोर वास्तव आपण विसरू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
त्यामुळे पतीने पतीला न कळवता कर्ज मिळवण्यासाठी असे दागिने गहाण ठेवल्यास ते मानसिक क्रूरतेच्या कक्षेत येईल, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने निर्णय दिला कि, “परिणामी, जर पती/पत्नीने स्वतःच्या वर्तनाने, मुलीच्या भविष्याची काळजी न करता, तिच्या लग्नासाठी असलेले दागिने गहाण ठेवले तर ते पत्नीने केलेल्या मानसिक क्रूरतेच्या कक्षेत येईल.” त्यामुळे न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(i-a) मध्ये नमूद केलेल्या क्रूरतेच्या आधारावर याचिका मंजूर केली. पतीची बाजू वकील शैलेंद्र बाजपेयी यांनी तर पत्नीतर्फे वकील पलाश राजानी यांनी बाजू मांडली.