पुणे : राज्य सरकारने राज्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील केले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगीही मिळाली आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची […]
टॅग: राज्य सरकार
MPSC ची संयुक्त पूर्वपरीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार
मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता […]
सर्व लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्यावेत, आपण हे करू शकता
मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने देखील पत्रक जाहीर करून मुंबईकरांना काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत […]
पुणे शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द, अजित पवार यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिका […]
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घणाघात
पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने फक्त गोल गोल फिरवलं, कुठलाही डेटा कोर्टात जमा केला […]
राज्यात नवे निर्बंध लागू, काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंट आढळल्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सरसकट सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही […]
तर ८ दिवसांत राज्यात पुन्हा कठोर निर्बंध, राज्य सरकारने दिले संकेत
पुणे : नवीन कोविड निर्बंधांनंतर राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत असलेल्या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, निर्बंध शिथील होताच काही भागांत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंधांचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात माहिती दिली. विजय वडेट्टीवार म्हणजे कि, “कालची आकडेवारी […]
आणि तुम्ही म्हणता राज्यातील पोलिसांवर तुमचा विश्वास नाही; हे धक्कादायक, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना सुनावले
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत परमबीर सिंग यांना कठोर शब्दांत सुनावले आहे. माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी […]
लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना
मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट […]
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या…
मुंबई : राज्य सरकारने आजपासून नवी नियमावली लागू केली असून राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्रशासनाला निर्बंध हटवायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. मात्र एका जिल्ह्यातून […]










