मुंबई : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. […]
टॅग: राज्य सरकार
‘बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही’, ममता बॅनर्जींकडून भूमिकेचा पुनरुच्चार, लोकांना केले ‘हे’ आवाहन
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी वक्फ विधेयकावर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला, त्या म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस सरकार या कायद्याला पाठिंबा देत नसल्याने राज्यात हा कायदा लागू करणार नाही. एक्सवरील एका दीर्घ पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी सर्व धर्माच्या लोकांना “शांत राहा” आणि “संयम ठेवा” असे आवाहन केले. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे, […]
राज्य सरकारची ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद, विरोधकांकडून टीका
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेला सणाच्या काळात राज्यातील लाखो लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तथापि, सध्या सरकारने ही योजना निरस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदाचा शिधा योजना महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2022 मध्ये सुरू केली होती. ही योजना विशेषतः […]
सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या […]
फडणवीसांचा मोठा दावा, राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करकपात केलीच नाही…
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. केंद्र […]
राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. […]
प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…
मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]
नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]
सर्वोच्च् न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द
नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, अध्यक्षांना शिवीगाळ तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, 5 जुलै 2021 रोजी भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन […]
मुंबई काय राज्यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्क फोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]