मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि […]
टॅग: उद्धव ठाकरे
नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे गटाचे तीव्र प्रत्युत्तर; ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली
मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी वादग्रस्त विधान केले. गोऱ्हे यांनी म्हटले की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणाल्या, […]
उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी अडथळा घातला; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
तुम्ही कितीही तारीफ करा… तो माणूस फक्त वेळेची वाट पाहातोय, आणखी एक नेता शिंदेंकडे येणार का? शिरसाटांचा दावा काय?
ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी, न्यायालयाची सुनावणीस परवानगी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याची सुनावणी करण्यास होकार दिला आहे. या प्रकरणावर ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्तेची सीबीआय, ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय 8 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार […]
शिवसेनेला मोठा धक्का! दोन दिवसांत नव्या चिन्हासाठी पर्याय सादर करा, निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन […]
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे
मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब […]
शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]