काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर भाष्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या
मध्य प्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली, असं पोलिसांनी सांगितलं. इंदौरमधील उमरीखेडा येथे तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष रमेश साहू यांचा ढाबा आहे. या […]
नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत- राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारताचे भविष्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, मोदी सरकार भारताचे भविष्य धोक्यात घालत आहे. तसेच सरकार अहंकारामुळे अस्सल चिंतांकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे ते जेईई-नीटसाठी […]
कंगनाजी, तुम्ही ज्यांचे आभार मानले, त्यांच्यापासूनच घाबरून राहायला हवं- सचिन सावंत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौत नेहमी बोलत असते. दरम्यान, भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र […]
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत
अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पुण्यातील […]
अनलॉक बाबत राज्य सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण- देवेंद्र फडणवीस
खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला टोला लगावला. “ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,” असं फडणवीस म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अनलॉक बाबत […]
काँग्रेसला लॉटरी लागली, मात्र त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही- भाजप खासदार सुजय विखे
“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र […]
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या नेत्यांनी चायनीज ऍप वापरल्याचं केलं उघड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उघड केलं व भाजपवर जोरदार टीका केली […]
निधी वाटपावरून काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप, शिवसेनेने झटकले हात
विकास निधीचे समान वितरण होत नसून विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेस आमदारांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘काँग्रेसचे आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार आहे. शिवाय, […]
राज्यात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलीय. राज्यातील खासगी वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं अनिल देशमुख यांनी या आधी ट्विट करून स्पष्ट केलं. यानंतर अनिल देशमुख यांनी आज ट्विट केलंय. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील, असं अनिल […]








