गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलीय. राज्यातील खासगी वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं अनिल देशमुख यांनी या आधी ट्विट करून स्पष्ट केलं. यानंतर अनिल देशमुख यांनी आज ट्विट केलंय.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. म्हणजेच खासगी वाहनांना यापुढेही राज्यात वाहतुकीसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत खासगी वाहनांना ई-पास बधनकारक असेल.
As per the discussions held with Hon’ble CM, the existing #MissionBeginAgain guidelines will be in effect in Maharashtra, till any further announcement. https://t.co/yMc7GSmORl
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 23, 2020
करोना व्हायरसच्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.




