congress rahul gandhi
देश राजकारण

नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत- राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारताचे भविष्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, मोदी सरकार भारताचे भविष्य धोक्यात घालत आहे.  तसेच सरकार अहंकारामुळे अस्सल चिंतांकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे ते जेईई-नीटसाठी (JEE-NEET) इच्छुक असणाऱ्यांकडे देखील दुर्लक्ष करत आहेत. या बरोबरच एसएससी आणि इतर परीक्षा घेण्याकडेही हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत ‘नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत’, असा घणाघातही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत