मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली […]
जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले.. काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन
मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसमधून भाजपच्या गोटात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार […]
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत
मुंबई : निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या […]
अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या महापालिकांना उद्धव ठाकरेंकडून निधी मिळत नाही..
मुंबई : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक […]
भाजपही किरीट सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही, अनिल परब यांचा टोला
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले कि, कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. […]
ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]
नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप
भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत […]
राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका
अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]
धक्कादायक! माजी नगरसेविकाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : माजी नगरसेविका नीता परदेशी राजपूत यांच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जयंत राजपूत हे नीता परदेशी राजपूत यांचे पती आहेत. नीता परदेशी राजपूत पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी होत्या. तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणूनही काम केलं आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]










