पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार
सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ […]
पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही
औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी […]
कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं- अजित पवार
कराड : कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाहण्याचं […]
‘यात कसली मर्दानगी’ म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपचा पलटवार
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहे. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीये. ही नामर्दानगी आहे, असा गंभीर आरोप […]
शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा, अन्नदान करण्याचे शिवसेना आमदाराकडून आवाहन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गरजूंना मदत करण्यासाठी कम्युनिटी फ्रिजची संकल्पना सुरु केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव येथे बाप्टिस्टा उद्यानाबरोबरच शिवसेना शाखा 209 मध्ये हा उपक्रम आता सुरु झाला आहे. येत्या काही दिवसांत भायखळ्यात आणखी आठ ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, […]
या कारणाने शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द….
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द होण्यावरुन एकनाथ खडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. यानिमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. भविष्यात […]
बिहारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री, सुशील कुमार मोदी यांनी केले अभिनंदन
बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. भाजपच्या रेणू देवी यांच्यासह तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तारकिशोर प्रसाद भाजप विधानसभेचे नेते म्हणून कटिहार मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर रेणू देवी चौथ्यांदा बेतियाह मधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सुशील कुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचे अभिनंदन केले. […]
काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य बाब वाटत असावी, कपिल सिब्बल यांचा पक्षाला घरचा आहेर
काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. “गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे […]
नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य…. हे असणार बिहारचे मुख्यमंत्री..
बिहार : मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार असून त्याआधी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी […]










