आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा संदर्भातल्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. त्यावेळी २१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकऱ्या, […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकार देणार Y दर्जाची सुरक्षा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. वाय दर्जाची सुरक्षा ही व्हीआयपीला दिलेली तिसऱ्या स्तरावरील सुरक्षा आहे. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी असतात तर एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ समाविष्ट असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित […]
कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार
केरळ : १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. […]
मॉस्को येथे भारत आणि चीन शिष्टमंडळांची २ तास २० मिनिटे चर्चा
रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्या शिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न […]
‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ हा मोदी सरकारचा विचार- राहुल गांधी
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर भाष्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त […]
‘सिंघम’ सारखा दिखावा करू नका, कर्तव्य पार पाडा- पंतप्रधान मोदी
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा सल्ला दिला. नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात. लोकांनी आपल्याला घाबरलं […]
मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे करोनाबाधित रुग्ण,करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार […]
अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती
भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. अजूनही एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याचा दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी केला आहे. […]
आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं- सीडीएस जनरल बिपिन रावत
चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सूचक वक्तव्य केलं. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनच्या कुरापतींचा पाकिस्तान फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी […]
आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज- लष्करप्रमुख जनरल नरवणे
चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दोन दिवस लडाखचा दौरा केला त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, ‘LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे.’ गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या […]










