चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सूचक वक्तव्य केलं. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनच्या कुरापतींचा पाकिस्तान फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, असं जनरल रावत म्हणाले.
जनरल रावत म्हणाले की, चीन ज्या पद्धतीनं आर्थिक आणि धोरणात्मक मदत पाकला करतंय हे पाहता तयारीत राहायला हवं. त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.




