महाराष्ट्र सरकारने काल राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT-CET) तारखांबाबत माहिती दिली आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात सीईटी परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र सीईटी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी यासाठीच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. तर […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
१०वी आणि १२वीच्या ऑक्टोबर २०२० सत्रातल्या परीक्षा पुढे ढकलल्या
महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या संकटामुळे १०वी आणि १२वीच्या ऑक्टोबर २०२० सत्रातल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आणि परीक्षा घेण्याची पद्धत याबद्दलची माहिती राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल. पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती […]
पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन
पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल […]
आरे जंगलासंदर्भात उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आनंद
आरेची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय काल (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेतील वृक्षतोडीवरून प्रचंड मोठं आंदोलन उफाळून आलं होतं. रात्रीच्या वेळी झालेल्या वृक्षतोडीवरून […]
या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यासंबंधी विचारणा केली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज […]
कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड अडवतात -राजेश टोपे
कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेडवर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत, असंही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]
व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड […]
नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली
नालासोपाऱ्यात केवळ 11 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही एकूण 20 फ्लॅट असलेली चारमजली इमारत होती. 2009 मध्ये ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. इमारत धोकादायक […]
महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूकीला परवानगी
लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी […]
कंगनाजी, तुम्ही ज्यांचे आभार मानले, त्यांच्यापासूनच घाबरून राहायला हवं- सचिन सावंत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौत नेहमी बोलत असते. दरम्यान, भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र […]










