आरेची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय काल (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेतील वृक्षतोडीवरून प्रचंड मोठं आंदोलन उफाळून आलं होतं. रात्रीच्या वेळी झालेल्या वृक्षतोडीवरून तत्कालीन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आरे जंगलासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं.
मित्रहो…..
आम्ही दिलेला शब्द जपला….
आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली
तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही
परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला
अभिनंदन आपणा सर्वांचे#संघर्षाचा विजय असो pic.twitter.com/rZMD1NjqrK— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020