अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला चोकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने शोविकला […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कंगना, जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे- रुपाली चाकणकर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या एका ट्विट वरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाऊंट वरून कंगनावर चांगलीच टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांचे ट्विट: मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा राणावत तू उतरलेल्या विमानतळापासून ते […]
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली कंगनाच्या वक्तव्यावर जोरदार टीका
अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विषयी वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं कि, मुंबई व महाराष्ट्राच्या विरुद्ध स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार […]
मुख्यमंत्र्यांकडून नागपूर येथील पूरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत जाहीर
नागपूर जिल्हयात नवेगाव खैरी प्रकल्पातून सरासरी ६८३९ क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून ६६९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण २५ गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे २ हजार ९०७ कुटुंबांतील ११ हजार ६४ व्यक्तींना फटका बसला आहे. अनेक नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले. या सर्व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार […]
नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोडताना विश्वास नांगरे पाटील झाले भावुक
राज्य सरकारने पोलिस दलात फेरबदल करत 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नांगरे पाटलांकडून पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नाशिक येथून पदमुक्त होऊन […]
कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, “कंगनाने मुंबई […]
कंगना म्हणते, ‘मी मुंबईत येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा’
कंगना राणावतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिच्याविरुद्ध संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंगना ट्विटकरून याबद्दल म्हणाली, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी […]
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला कोरोनाबाबतचा आढावा
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील […]
TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना न्याय मिळवा म्हणून गावा-गावातून उमटल्या प्रतिक्रिया
संगमनेर : TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरले. त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मृत्यूला कारनीभूत असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मा. सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले. यावेळी दै. लोकसत्ता चे जेष्ठ पत्रकार सितारामजी चांडे, दै. पुण्यनगरी चे पत्रकार संजय गायकवाड, दै. […]
प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आज swab टेस्ट केंद्राची सुरुवात करण्यात आली. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सहकार्य यात घेतले जाईल. काही दिवसातच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करू घेण्याचा […]










