अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई विषयी वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं कि, मुंबई व महाराष्ट्राच्या विरुद्ध स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी कंगनाच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे.
देशाला अर्थपुरवठा करणाऱ्या, सर्व जाती-धर्म व भाषेतच्या लोकांना सामावून घेणाऱ्या आणि पुष्कळ जणांच्या जीवनाला अर्थ मिळवून देणाऱ्या मुंबईविषयी व्यर्थ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं…
मुंबई व महाराष्ट्राच्या विरोधात स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही.— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 4, 2020




