नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
ICC ने BCCI ला विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. विश्वचषकापूर्वी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित साामने UAE येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्वचषक तेथेच खेळवणे सोयीचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे, तर जूनमध्ये ‘आयपीएल’संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे,’’ असे मत ICC च्या पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.




