Government Announcement Hike Msp For Kharif Crops 2021-22

खुषखबर! खरीप हंगामापूर्वीच केंद्र सरकारने केली MSP दरवाढीची घोषणा, जाणून घ्या…

देश शेती

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये प्रति क्वींटलने वाढवला आहे. यानंतर तूर आणि उडीद या दोन्ही डाळींच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) क्विंटल मागे ३०० रुपयांनी वाढ केली आहे. सामान्य प्रतिच्या धानाचा भाव हा १८६८ रुपये प्रति क्वींटल होता. तो आता २०२१-२२ साठी वाढवून १९४० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे. बाजरीचा भाव २०२०-२१ मध्ये २१५० रुपये प्रति क्विंटल होता तो आता २२५० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्वीट केलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे. खरीप विपणन हंगाम २०२१-२२ साठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींना आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत