नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये प्रति क्वींटलने वाढवला आहे. यानंतर तूर आणि उडीद या दोन्ही डाळींच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) क्विंटल मागे ३०० रुपयांनी वाढ केली आहे. सामान्य प्रतिच्या धानाचा भाव हा १८६८ रुपये प्रति क्वींटल होता. तो आता २०२१-२२ साठी वाढवून १९४० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे. बाजरीचा भाव २०२०-२१ मध्ये २१५० रुपये प्रति क्विंटल होता तो आता २२५० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
किसानों की आय दोगुनी करने के लिए मोदी सरकार का एक और महत्वपूर्ण निर्णय।
खरीफ विपणन वर्ष 2021-22 के लिए विभिन्न खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) में बढ़ोतरी की घोषणा। pic.twitter.com/eln20Buelh
— BJP (@BJP4India) June 9, 2021
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्वीट केलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे. खरीप विपणन हंगाम २०२१-२२ साठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींना आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की अध्यक्षता वाली आर्थिक मामलों की मंत्रिमंडलीय समिति ने कृषि उपज की सरकारी खरीद, सीजन 2021-22 के लिए सभी खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) में बढ़ोतरी को दी स्वीकृति…@AgriGoI pic.twitter.com/o8gg6U3RZz
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 9, 2021