The thugs threatened and force her for marriage

OMG! नवरदेवाने फोटोग्राफर आणला नाही, संतापलेल्या वधूने थेट लग्नच मोडले…

देश

उत्तर प्रदेश : आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकांची लग्ने मोडल्याचा घटना समोर येतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मंगलपूरमधून समोर आली आहे. नवरदेवाकडच्या लोकांनी फोटोग्राफर आणला नाही, म्हणून नवरीला राग आला आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. अखेर फोटोग्राफरला न आणल्यामुळे लग्न मोडले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर गावात शनिवारी रात्री वरपक्षाची मंडळी नाचत-गात लग्नासाठी पोहोचली. यानंतर काही विधी पार पडले. रात्री उशिरा जयमाला विधी सुरू झाला आणि नववधू तिथे पोहोचली. मात्र, वधूने बघितले की नवरदेवाच्या बाजूने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोणीही फोटोग्राफर आणला नव्हता. त्यामुळे या नवरीला खूप राग आला. ती स्टेजवरून उठली आणि निघून गेली. घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण वराच्या बाजूने फोटोग्राफर का आला नाही याचा तिला खूप राग आला. ती म्हणाली कि, लग्नातील मौल्यवान आणि मनमोहक क्षण टिपण्यासाठी ज्या व्यक्तीने फोटोग्राफर आणला नाही, तो भविष्यात माझी काळजी कशी घेणार?

सुरुवातीला घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पंचायत सुरू झाली. मात्र, वधूने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना सर्व सामान परत केले आणि वरपक्षाकडील मंडळी परत निघाली. फोटोग्राफरला न आणण्यावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि अखेर लग्न मोडले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत