मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. सोमवारी (१६ ऑगस्ट) पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Severe weather warning issued by IMD for Maharashtra for 14-18 Aug,
Parts Konkan & M Mah D1,D4,D5 isol heavy rainfall warning,
Possibility of Rainfall associated with TS? & lightning interior of state D3-D5
The area covered under is increasing is good sign for state. pic.twitter.com/9j4xj2Yegm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 14, 2021