दिल्ली : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे मोठा हातभार लागेल आणि अनेकांचे प्राण वाचतील अशी आशा आहे.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार आणि श्री. नितीन गडकरीजी यांचे मनःपूर्वक आभार ! @narendramodi @nitin_gadkari #BJP4SEVA pic.twitter.com/Q3teoxLRJc
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2021