नवी दिल्ली : देशात जोपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. रेमेडेसिव्हीर हे औषध न मिळाल्यामुळे कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारास उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे निर्देश केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.