मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे […]
इतर
नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. […]
ब्रेक द चेन : जाणून घ्या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे…
मुंबई : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. १. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ? ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी […]
पुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण.. पण अजित पवार यांनी दिला ‘हा’ कडक इशारा…
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले कि, “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर […]
…म्हणूनच ED कडून अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे – एकनाथ खडसे
मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच […]
मुंबईत निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त; खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी – एफडीए
मुंबई : अन्न आणि औषध विभाग मार्फत मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार विविध दुकानांवर […]
विद्यार्थी तणावात राहू नये यासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं यंदाचं शैक्षणिक वर्ष online अभ्यासातच सुरु आहे. परंतु online शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षणात खूप फरक असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ट्विट करत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. तसेच ऑनलाइन परीक्षा कठीण असल्या तरी देखील […]
कोळी बांधव आणि वारकरी आपल्या अडचणी मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते. राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? […]
नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा दिला. बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. जेथून मुख्यमंत्री दोन्ही गावांच्या […]
IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय
IPL 2020 : सनराजयर्स हैदराबादने अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या ३५व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत […]










