मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच ED कडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची माझ्या मनात भीती आहे,’ असं खडसे यांच्यातर्फे सांगण्यात आला.
‘भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात २०१६ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत तपास पूर्ण करून २०१८ मध्ये या आरोपांत तथ्य नसल्याचे म्हणत क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता. तोपर्यंत इडीचा या प्रकरणात हस्तक्षेप नव्हता. मात्र, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्यानंतर अचानक या प्रकरणात ED चा प्रवेश झाला. म्हणूनच ED कडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे, असं खडसेंकडून सांगण्यात आलं.
पीएमएलए कायद्यातील तरतुदींप्रमाणे चौकशीत सहकार्य न केल्यास अटक करण्याची तरतूद आहे. तसेच आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने भारतीय दंड संहितेच्या कलम ४३८ अन्वये अटकपूर्व जामीन मिळवण्यातही अडसर आहे. इडीच्या समन्सविरोधात अपिल करण्याचाही पर्याय नाही. म्हणून याचिकेद्वारे संरक्षण मिळण्यासाठी विनंती केली आहे’, असा युक्तिवाद खडसे यांनी अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत मांडला. वेळेअभावी खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी (१५ मार्च) ठेवली.




