जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे […]
कोरोना
धक्कादायक – थंडीमध्ये वाढतो आहे कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट; लॉकडाउनची घोषणा
युरोप, अमेरिकेत थंडीमुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार […]
देशातील सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल – केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी
देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित करताना भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया […]
धक्कादायक : करोना लसीच्या चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू
ब्राझील : ब्राझीलमध्ये अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला तरीही लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलाही शंका नाहीय, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लशीचे […]
लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन – पंतप्रधान मोदी
दिल्ली : करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या […]
दिलासादायक : देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट
देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ७ लाख ७२ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, […]
5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना टेस्ट विकसित – ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, […]
शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो करोना
भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. बलराम भार्गव म्हणाले कि, “भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. […]
पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही. मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. […]
नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा- राजेश टोपे
लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू. कोरोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही […]









