कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी रूग्णसंख्या आणि प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं कि, “जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत […]
कोरोना
धक्कादायक : हैदराबादमधील ८ सिंहांना कोरोनाची लागण
हैदराबाद : हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयातल्या ८ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. सेंटर फॉक सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) २९ एप्रिलला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यांनी RT PCR चाचणीत प्राणिसंग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं. वन्यप्राण्यांची देखभाल करणाऱ्या पशुचिकित्सकांना २४ एप्रिलला या सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यांना भूख न लागणं, […]
रेमडेसिवीर: विखे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा करायला नको होता, हायकोर्टाने सुनावले
औरंगाबाद: एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर ताशेरे ओढले. डॉ. सुजय विखे यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी […]
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करा, पण त्याआधी…
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही सल्ले दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने लस खरेदी करण्यासंदर्भातील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा असंही म्हटलं आहे. नाहीतर हे संविधानातील कलम २१ चं उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. वृत्तानुसार, […]
नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणणाऱ्या सोनियांकडे खरंच दुरदृष्टी.. मोदींवर घणाघाती टीका
मुंबई : देशात कोरोनामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागत आहेत आणि केंद्र सरकार आरोग्य सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. या सगळ्या परिस्थितीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानलं आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट करत देशाच्या गंभीर […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका […]
लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन
अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी […]
भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय, भारताला मदत करण्यात विश्व कमी पडलं – अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. फौसी
नवी दिल्ली : भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावलं तर परिस्थिती सुधारू शकते, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत. देशात तात्काळ […]
प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजित यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बिक्रमजित कंवरपाल यांचा जन्म हिमाचल प्रदेशात एका आर्मी ऑफिसरच्या घरात झाला होता. विक्रमजीत स्वतः देखील सैन्यात नोकरीस […]
येत्या २-३ दिवसांत कोरोनाचा संसर्ग पोहोचणार शिगेला..
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. देशात शुक्रवारी कोरोना […]










