नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी विकसित भारत – रोजगार आणि अजीविका मिशन (ग्रामीण) साठी हमीर-व्हीबी-जी राम जी विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. विधेयकावर विरोधकांनी जोरदार निषेध नोंदवला; काही सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करून कागदपत्रे फाडली आणि सभापतींच्या खुर्चीकडे फेकली, ज्यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विरोधकांनी विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली, मात्र सभापतींनी यावर […]
टॅग: Rajya Sabha
ब्रेकिंग! जगदीप धनखर यांच्याविरोधात राज्यसभेत काँग्रेस आणणार अविश्वास प्रस्ताव, सपा-टीएमसीचा देखील पाठिंबा
नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील वातावरण थोडे तापलेले आहे. त्यातच आता राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले […]
राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर सापडला नोटांचा बंडल, चौकशी सुरु
नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचा बंडल सापडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आहे. याबाबत खुद्द सभापतींनी सभागृहात सांगितले आहे. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखर यांनी माहिती दिली कि, ‘काल (गुरुवारी) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक 222 मधून […]
संसदेत प्रचंड गदारोळ! आणखी तीन खासदार राज्यसभेतून निलंबित
नवी दिल्ली : संसदेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आणखी तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता तसेच संदीप पाठक आणि भुयान आहेत. या सर्वांना फक्त या आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याला […]
भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला शरद पवार यांचा पाठिंबा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. […]
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर गुलाम नबी आझाद यांनी दिलं ‘हे’ उत्तर
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदेत त्यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु आता स्वत: गुलाम नबी […]
मी तो भाग्यवान आहे जो कधीही पाकिस्तानला गेला नाही, निरोप घेताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले काही किस्से
राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचे काही किस्से सांगितले. जम्मू भागातून आलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद […]
ब्रेकिंग : राज्यसभेने जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2021 ला मंजुरी दिली
राज्यसभेने जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2021 ला मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम, 2019 मध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रपतींनी गेल्या महिन्यात अध्यादेश काढला होता. आज या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक, २०२१ राज्यसभेत सादर केले होते. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय […]
देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा जन्म झाला आहे, सावध राहण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी भाषणात ते म्हणाले कि, आंदोलनजीवी जमात उदयास आली आहे. या जमातीपासून सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, ते कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी, बुद्धीजीवी असे शब्द आपल्याला माहीत […]









