IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा T२० सामना दुपारी १.४० पासून रंगणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचा कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास उंचावणार आहे. पुढील दोन्ही […]
टॅग: भारत
Ind vs Aus 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय
Ind vs Aus 1st T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाचं 162 रन्सचं आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 150 रन्सपर्यंत मजल मारता आली आणि टीम इंडियाने ही मॅच 11 रन्सने जिंकली. मॅचच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम […]
Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]
देवी अन्नपूर्णाची १०० वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली मूर्ती येतेय भारतात
१०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली. मोदी म्हणाले, “मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक […]
पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]
India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी पराभव
AUS vs IND : पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी करत डाव सावरला परंतु त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले […]
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर खेळवला जात आहे. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. […]
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार
धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]
भारत आणि चीनमधील तणाव संपण्याचे संकेत
भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादावर आणि तणावावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. लडाखमधल्या काही भागातून माघार घेण्यासंबंधी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये एकमत झाले आहे. एप्रिल-मे आधी दोन्ही देशांचे सैन्य ज्या ठिकाणी होते, त्याच स्थानावर पुन्हा तैनात होतील. चुशूलमध्ये सहा नोव्हेंबरला आठ कॉर्प्स कमांडर स्तराची बैठक झाली. त्या बैठकीत दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये हा फॉर्म्युला ठरला आहे. […]
एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही, भारताची साथ महत्वाची – मॉर्गन ऑर्टागस
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे की, एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी भारताची साथ खूप महत्वाची आहे. दोघेही संयुक्तपणे मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करीत आहेत. ऑर्टागस म्हणाल्या की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. […]










