IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवण्याची पाकिस्तानकडे संधी आहे.
It’s here.#India and #Pakistan against each other in #T20WorldCup action tonight in Dubai! pic.twitter.com/2C6IhSXf14
— ICC (@ICC) October 24, 2021
आयपीएलच्या फेज-2 मधील सामन्यांच्या आधारावर बघितले तर दुबईच्या खेळपट्टीवर 150 ते 170 धावा केल्या जातात. फेज-2 मध्ये येथे 13 सामने खेळले गेले. यापैकी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 सामने जिंकले. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळाला. या दृष्टीने भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देऊ शकतो.
या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाकडे बोट दाखवणारा कोणताही मोठा पैलू नाही. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग पाचवेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.