नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० ऑक्टोबर) देशवासियांना संध्याकाळी ६ वाजता संबोधित करणार आहेत. देशात आता अनलॉक ५ सुरु झालेला आहे. अशावेळी आता पंतप्रधान मोदी हे कोणती मोठी घोषणा करणार का? याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्वीट करुन माहिती दिली आहे. यावेळी ते कोणत्या याविषवर बोलतील याची कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, देळात आता ज्या पद्धतीने कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे ते लक्षात घेता ते याच विषयी बोलण्याची शक्यता अधिक आहे.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं होतं तेव्हा त्यांनी देशासमोरील आव्हानं आणि त्याचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना याबाबतीच माहिती दिली होती. त्यामुळे आता याच उपाययोजनांवर पुन्हा जोर दिला जाण्याबाबत पंतप्रधान मोदी बोलू शकतात. जेव्हा कोरोनाचे आव्हान जगासमोर होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी आपण या संकटाशी लढण्यास कसे तयार असायला हवे हे सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी आज देशावासियांना जे संबोधन करणार आहेत ते नक्कीच विशेष असणार आहे.




