Avi Kadam
क्रीडा महाराष्ट्र

सचिन तेंडुलकरने कोरोनामुळे गमावला सर्वात जवळचा मित्र; ट्वीट करुन दिला आठवणींना उजाळा…

मुंबईः कोरोनाचा तडाखा क्रिकेट जगतासाठी आदरणीय असलेल्या मास्टरब्लास्टर सचिनला बसला. कोरोनामुळे सचिनने त्याचा अतिशय जवळचा मित्र गमावला. सचिन तेंडुलकरने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनामुळे मित्र गमावल्यामुळे सचिन प्रचंड दुःखी झाला. भावूक होत सचिनने ट्विटरवर मित्राविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. सचिन ट्वीटमध्ये म्हणतो, ‘माझा प्रिय मित्र अवी कदम याचे निधन झाले. शाळेच्या दिवसांपासून अवी […]

Devendra Fadnavis's
देश महाराष्ट्र राजकारण

अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा

मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात  पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र […]

prakash ambedkar
महाराष्ट्र

महाराष्ट्रात वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा करावा- प्रकाश आंबेडकर

परतीच्या कोसळलेल्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, त्याबरोबरच व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे. […]

Four small siblings were brutally killed
महाराष्ट्र

चार चिमुकल्या भावंडांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

जळगाव : रावेर तालुक्यात बोरखेडा शिवारातील एका शेतात असलेल्या घरात अज्ञातांनी चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही खळबळजनक घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला […]

maharshtra CM Uddhav Thakarey
कोरोना महाराष्ट्र

पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही. मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. […]

Suresh Namdev Gore passes away
महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन

खेड : शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५६ वर्षांचे होते. १७ सप्टेंबर रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा […]

health minister rajesh tope
कोरोना महाराष्ट्र

नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा- राजेश टोपे

लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू. कोरोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही […]

Central Railway
महाराष्ट्र

मध्य रेल्वेने 8 एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय केला जाहीर

काल मध्य रेल्वेने मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यात वाढ करून आठ एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस मध्य रेल्वे सुरु करणार आहे. येत्या 11 तारखेपासून या एक्सप्रेस धावू लागतील असे मध्य रेल्वेने […]

sushant singh rajput
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले फेक अकाऊंटस्; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला […]

Sharad Pawar
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस: LGBT सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. आता राष्ट्रवादीनं परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय घेत एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा […]