school education minister varsha gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली आहे. मात्र महाराष्ट्रात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील की नाही, याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी […]

home minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली.  ते म्हणाले की, “कंगनाने मुंबई […]

railway started
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूकीला परवानगी

लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी […]

devendra fadanvis BJP
महाराष्ट्र राजकारण

अनलॉक बाबत राज्य सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण- देवेंद्र फडणवीस

खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला टोला लगावला. “ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,” असं फडणवीस म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अनलॉक बाबत […]

शैक्षणिक

महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा १७ ऑगस्टपासून तर, पदव्युत्तर मेडिकलच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्याची तयारी केली आहे. मात्र, करोनाच्या पार्शवभूमीवर परीक्षेच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी याचिका काही विद्यार्थ्यांनी अॅड. कुलदीप निकम यांच्यामार्फत केली होती. ‘परीक्षा घेण्यास विरोध नाही. मात्र, परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन […]

महाराष्ट्र

दूध दरवाढीसाठी राज्यात स्वाभिमानीचं आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी व प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूधपावडर आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]

chief minister uddhav thackeray
महाराष्ट्र राजकारण

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सुशांत सिंह राजपूत […]

महाराष्ट्र राजकारण

आपलं राज्य सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं- छगन भुजबळ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शौर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास […]