prakash ambedkar

महाराष्ट्रात वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा करावा- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र

परतीच्या कोसळलेल्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, त्याबरोबरच व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे. ‘वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे. शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय मदत देणार आहेत हे जाहीर करावं,’ असंही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत