मुंबई: एकनाथ शिंदे यांचा कोणताही बालेकिल्ला नाही, त्यांनी पैशांच्या जोरावर काही बालेकिल्ले उभे केले आहेत. शिंदे यांनी ५० वर्षांत कोणतं महान कार्य केले आहे की बालेकिल्ले उभारले? ते काय लोकमान्य टिळक आहेत? त्यांची विचारधारा काय आहे? ते काय वल्लभभाई पटेल आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटलबिहारी वाजपेयी आहेत? ज्या दिवशी अमित शाह राहणार नाहीत, त्यादिवशी यांची […]
टॅग: Eknath Shinde
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल, यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन, जेजे मार्ग […]
उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी अडथळा घातला; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
तुम्ही कितीही तारीफ करा… तो माणूस फक्त वेळेची वाट पाहातोय, आणखी एक नेता शिंदेंकडे येणार का? शिरसाटांचा दावा काय?
ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
गृहखात्याऐवजी शिवसेनेला मिळणार ‘हे’ महत्वाचं खातं? एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, अशी माहिती आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणताच तोडगा निघत नव्हता. याबाबत अजूनही अनेक तर्क-वितर्क […]
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…
मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत […]
दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं का? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी
मुंबई : दीड हजार रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? लाडक्या भावांप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनाही दरमहा १० हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारकडे केली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन […]
मुख्यमंत्र्यांची कबुली – लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका, कांदा, दूध, कापसाच्या दरांवरून रोष भोवला…
मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने १५ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. मात्र कांदा, दूध, कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत […]








