मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण […]
टॅग: Anil Deshmukh
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला होता विमानाने प्रवास
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येत आहे की या काळात अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास […]
ब्रेकिंग : परमबीर सिंह यांची अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. एकीकडे विरोधी पक्ष राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, आता मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग […]
परमबीर सिंह यांनी नमूद केलेली ‘ती’ तारीख संशय निर्माण करणारी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यात सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता या आरोपांवरून संशय निर्माण होत आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं […]
परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]
गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुल करण्यास सांगितलं – परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे : मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी […]
क्राईम ब्रान्चमधून सचिन वाझे यांची बदली, विरोधकांनी केली अटक करण्याची मागणी
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम […]
‘पतंजली’ च्या कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात मनाई
मुंबई : कोरोनावरील कोरोनील औषधावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे. हे औषध योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेलं आहे. त्यातच आता इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे याची दाखल घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली. […]
आनंदाची बातमी : तात्काळ मदतीसाठी पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस ही नवी यंत्रणा.. १०० नंबर कालबाह्य…
पुणे : राज्यात ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली […]
शरजील उस्मानीवर होणार कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
मुंबई : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर असून आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य करत चिथावणीखोर भाषा वापरली होती. तो म्हणाला होता की, “आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या […]










