कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. […]
टॅग: लॉकडाऊन
राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]
कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे
मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय […]
लॉकडाऊनवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद! राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला तीव्र विरोध
मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत […]
पुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण.. पण अजित पवार यांनी दिला ‘हा’ कडक इशारा…
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले कि, “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर […]
मोठी बातमी : पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या मागणीला अजित पवार यांचा विरोध
पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊन करायचे याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. माहिती मिळत आहे की प्रशासनाने पुण्यात १ ते १४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवार यांनी या मागणीला विरोध केला आहे. पुण्यात गेल्या काही […]
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. […]
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा
मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]
मुंबई उपनगरीय लोकलसेवा सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती..
मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून होणाऱ्या आडकाठीवरही नाराजी व्यक्त केली. ‘सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही […]
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि […]









