नवी दिल्ली : 370 ही तात्पुरती कराराची बाब होती. तुम्ही आमच्याकडे 17 महिन्यांत काय केले याचा हिशोब मागता. पण तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष का चालू ठेवलं, याचं उत्तर कोण देईल? याआधी ७० वर्ष राज्य करण्याची संधी मिळालेल्यांनी ३७० तेव्हाच का हटवलं नाही त्याचे अगोदर उत्तर द्यावे. ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या सत्ता होती, त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं […]
टॅग: केंद्र सरकार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार
केंद्र सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. […]
शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. “कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. […]
केंद्र सरकारने घेतला तातडीचा निर्णय, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी
केंद्र सरकारने तातडीचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं […]
कांद्यावरील निर्यातबंदी अखेर तीन महिन्यांनी केंद्र सरकारने उठवली
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवत देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येत्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी धोरणात बदल केला. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा देशातील कांदा निर्यात करता येणार आहे. कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीच्या पाठोपाठ कांदा व्यापाऱ्यांवरदेखील निर्बंध […]
दिलासादायक : वीज व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने केले नियमांत बदल, ग्राहकांना होणार अनेक फायदे
वीज व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. वीज ग्राहकांना सक्षम बनविण्यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांतर्गत वीज जोडणे, वीजबिल भरणे व वीजपुरवठा करणे यासाठी ग्राहकांचे उर्जा अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांना वीज पुरवठा संदर्भात वीज वितरण कंपन्यांकडून किमान मानक सेवा मिळण्याचा अधिकार आहे. नव्या नियमाविषयी माहिती देताना ऊर्जामंत्री आर. के. […]
मोठी बातमी : कंपन्या पर्मनन्ट कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाहीत – केंद्र सरकार
केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरु केला. कंपन्यांनी या कायद्याचा संदर्भ देत पर्मनन्ट नोकरदारांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलण्यास सुरुवात केली. मात्र आता अशा कंपन्यांना सरकारनेच इशारा दिला आहे. नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही पर्मनन्ट कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाही असं […]
मोठी बातमी : कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा, उच्च न्यायालायाचा राज्य सरकारला दणका
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. हा राज्य सरकारसाठी मोठा दणका आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत […]
ED आणि CBI ची तुलना कुत्र्यांशी, संजय राऊत यांनी ट्विट केलं व्यंगचित्र
महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]
शेतकरी पुत्राने मागितली राज्यापालांना भेटण्यासाठी वेळ..
सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे […]










