सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन, शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे म्हणून एका शेतकरी पुत्राने राज्यापालांची भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. हे वेळ त्याने मेल करून मागितली आहे काय म्हटलं आहे या मेल मध्ये, महोदय, मी विरेश आंधळकर, रा – सौंदरे, ता – बार्शी, जि – सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.
The farmer’s son asked for time to meet the governor
कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या
ट्विटर & फेसबुक फॉलो करा.
केंद्र आणि राज्य सरकारचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विरेश आंधळकर या युवा शेतकऱ्याने इमेलद्वारे वेळ मागितली. शेतकरी पुत्राला कांदा उत्पादकांवर अन्याय होत असताना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Share this :
कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.
मुंबई : जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदचे लोकप्रतिनिधी यांचे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३’चे आयोजन करण्यात आले. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक […]
ठाणे : ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एका नागरी अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. सोमवारी (१० फेब्रुवारी) […]
मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 4 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात […]