मुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात सुमारे ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उद्योगमंत्री सामंत म्हणाले […]
Sample Page
अभिनेता कमल रॉय यांचे निधन, वयाच्या 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता कमल रॉय यांचे वयाच्या 54व्या वर्षी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमल रॉय हे प्रसिद्ध नाट्य अभिनेते छावरा व्ही.पी. नायर आणि विजयालक्ष्मी यांचे पुत्र होते. कलावंतांचा वारसा लाभलेल्या या कुटुंबात त्यांचे आजोबा सुरनंद कुंजन पिल्लई हे सुप्रसिद्ध […]
देशावर शोककळा! लष्कराचे वाहन 200 फूट दरीत कोसळले; 10 जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला. डोडा येथील भादरवाह–चंबा आंतरराज्यीय मार्गावर खानी टॉपजवळ लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरून सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे लष्करी वाहन उंच भागातील चौकीकडे जात होते. […]
बीडमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याची झडप, शालमुळे वाचला जीव
बीड : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात बुधवारी दुपारी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. कोळवाडी गावातील ४५ वर्षीय मनकर्णा शिवराम नेटके यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना रूपपूर शिवर परिसरात घडली. सकाळच्या सुमारास जवळच्या डोंगराळ भागातून बिबट्याची डरकाळी ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, शेतात काम करणाऱ्या मजुरांनी याकडे विशेष […]
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश […]
गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता
मुंबई : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावा, तसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३–२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी […]
अक्षय कुमारच्या गाडीला धडक! जुहूमध्ये थरारक अपघात, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य […]
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध, तरुणीची पहाटेच पोलीस ठाण्यात धाव…
रायगड : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन १८ वर्षे ७ महिन्यांच्या तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार अलिबाग तालुक्यात समोर आला आहे. पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आरोपी नितेश पाटील उर्फ पप्प्या, रा. खंडाळे, याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी […]
राज्यात चार दिवस कडक दारूबंदी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असताना, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (SEC) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष व्हावी यासाठी १३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये “ड्राय डे” लागू करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, मुंबई, पुणे, […]










