पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत पाकिस्तानकडे असलेल्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत असल्याचं म्हटलं. तसंच या अणुहल्ल्याने मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नसल्याचंही ते म्हणाले.
पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर ते अखेरचं युद्ध असेल,” अशी धमकीही रशिद यांनी दिली. आमच्याकडील शस्त्रं हे मुस्लिमांचा जीव वाचवून थेट आसामपर्यंतच्या प्रदेशावर हल्ला करु शकतात,” असा अजब दावा देखील रशीद यांनी केला आहे.
शेख रशीद यांनी यापूर्वीही भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती.




