कोरोनाचा कहर काहीसा कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून, दैनंदिन काम देखील सुरु आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रभर शाळाही हळू हळू सुरू व्हायला लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु असून आता शहरी भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा उघडू लागल्या आहेत.
नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. तब्बल ११ महिन्यांनंतर शाळा सुरु झाल्या असून, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.