मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Nowcast warning at 1900hrs,10 Oct: Thunderstorm with lightning mod to intense spells of rain with gusty winds 30-40kmph very likely to occur at isol places in districts of Ratnagiri,Thane Sindhudurg,Satara,Sangli,Solapur, Kolhapur,Palghar,Raigad,Mumbai nxt 3-4hrs. TC
-IMD MUMBAI pic.twitter.com/LnjJwKsekc— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 10, 2021