औरंगाबाद : औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर कळंत्री यांची किरण कळंत्री ही दुसरी पत्नी होती. गजानगरमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलगा व मुलगीसोबत राहत होते. दोघांचे मृतदेह दोन दिवसांहून अधिक वेळ घरात पडून होते. आज परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा तपास केला असता घरातील खालच्या मजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर एक असे दोन मृतदेह पोलिसांना आढळले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते.
औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार
या दाम्पत्याच्या मुलीने दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी शामसुंदर यांनी तिला एसबी कॉजेलमध्ये सोडले होते. त्यानंतर दुपारी तिच्या भावाने तिला फोन केला आणि ते गावी जाणार असल्याचे सांगत तिला काकांच्या घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे आपण कॉलेजनंतर काकांच्या घरी गेलो, असे मुलीने सांगितले. मात्र, या घटनेनंतर शामसुंदर यांचा मुलगा आकाश कळंत्री फरार आहे. त्यामुळे त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
उपायुक्त दिपक हिरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल ढुमे, पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे.
थरकाप उडवणारा Video! सिंहासोबत मस्ती करणे पडले महागात, बोटाची हाडंच फक्त शिल्लक राहिली आणि…
भयंकर! तरुणाने दोन प्रेयसींसाठी केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात…