लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त कंगना रानौतने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच कंगनाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या बलिदानासाठी कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून येऊन देखील सरदार पटेल यांनी केलेल्या त्यागाबद्दल कंगनाने दुःख व्यक्त केले.
कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या प्रसन्नतेसाठी पहिले पंतप्रधान म्हणून सर्वात योग्य व निवडून आलेले पद नाकारले, कारण गांधीजींना वाटत होते की नेहरू चांगले इंग्रजी बोलतात.” सरदार पटेल यांना काही फरक पडला नाही, परंतु देशाने अनेक दशके याचा त्रास सहन केला. आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपण निर्लज्जपणे हिसकावून घ्यावे. ”
He sacrificed his most deserving and elected position as the First Prime Minister of India just to please Gandhi because he felt Nehru spoke better English, #SardarVallabhbhaiPatel did not suffer but Nation suffered for decades,we must shamelessly snatch what is rightfully ours. pic.twitter.com/TGxcOlDB3K
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 31, 2020
कंगनाने पुढच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “सरदार पटेल हे भारताचे खरे लोहपुरुष होते. माझा विश्वास आहे की गांधीजींना नेहरूंसारखी एक कमकुवत व्यक्ती हवी होती, जेणेकरून त्यांना समोर करून गांधीजींना देश ताब्यात ठेवता व चालवता आला असता. योजना चांगली होती, पण गांधींच्या हत्येनंतर जे घडले, ती आपत्ती ठरली ”
कंगनाने शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. आपणच आजची अखंड भारत देणारी व्यक्ती आहात. परंतु पंतप्रधानपदाशी तडजोड करून तुम्ही तुमचे नेतृत्व व दृष्टी आमच्यापासून दूर केली. आपल्या निर्णयाबद्दल आम्हाला दुःख वाटतं. ”
Wishing India’s Iron man #SardarVallabhbhaiPatel a happy anniversary, you are the man who gave us today’s akhand Bharat but you took your great leadership and vision away from us by sacrificing your position as a Prime Minister. We deeply regret your decision ?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 31, 2020