दि. १८ ऑगस्ट २०२१, मंत्रिमंडळ बठकीत घेण्यात आले हे महत्वपूर्ण निर्णय… बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये याप्रमाणे आकारण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
व्यंकय्या नायडू झाले भावूक, विरोधकांच्या गदारोळावर व्यक्त केली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्याची सुरुवात देखील गोंधळाने झाली. लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं असून काल राज्यसभा सभापतींवर पुस्तक भिरकावल्याच्या घटनेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी निंदा केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यावेळी भावूक झालेले दिसले. सदनात काल झालेल्या घटनेवर सभापतींनी निराशा व्यक्त केली. विरोधी पक्ष […]
राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते सस्पेंड, कारण…
Rahul Gandhi Twitter : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण त्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं. […]
प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे मागणी निवेदन उपभियंत्याकडे सुपूर्द
संगमनेर : उंबरी-शेडगाव या गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आर.आर.पाटील यांना संबंधित गावातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. या कामाच्या निविदा निश्चित झाल्या असतानाही, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामस्थांची […]
सर्व लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्यावेत, आपण हे करू शकता
मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने देखील पत्रक जाहीर करून मुंबईकरांना काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पूरग्रस्तांना आश्वासन, काय आहेत पूरग्रस्तांच्या मागण्या, जाणून घ्या..
सांगली : राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. […]
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…
सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]
भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी सुपूर्द
लोणी : कोकण आणि परिसरातील नागरीकांच्या मदतीसाठी भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजयुमोचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रूपयांची रक्कम मदतनिधीस सुपूर्द केली. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नूकसानीत तिथल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. या नागरीकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील नागरीक आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पुढाकार घेण्याचे […]
पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर – खासदार अमोल कोल्हे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे म्हणाले कि, “खेड बाह्यवळण रस्त्याचे श्रेय द्यायचे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. Rajya Sabha MP […]










