मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]
टॅग: उद्धव ठाकरे
लॉकडाऊनवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद! राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला तीव्र विरोध
मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत […]
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना – राष्ट्रवादीत चर्चा की वाद?
सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीमध्येही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधकांनी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लसी घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे […]
मुख्यमंत्री साहेब, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल
नाशिक : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 21 दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कशाची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. मुख्यमंत्री साहेब, खरंच खुर्ची […]
संजय राऊत यांच्यावर महिलेचे अतिशय गंभीर आरोप, मुंबई उच्च न्यायालयात केली तक्रार
खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याविषयी तक्रार करणारा अर्ज दाखल केला आहे. आपल्या मागे माणसे लावणे, छळवणूक, हेरगिरी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, धाक दाखविणे तसेच विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले. महिलेने याचिकेत […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने विरोधी पक्ष आक्रमक; फडणवीसांनी केला ‘हे’ गंभीर आरोप
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत घेणार असा निर्णय झाला. बैठकीवर विरोधी पक्षाचे नेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस निषेध नोंदवून बाहेर पडले त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हटले कि जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणेघेणे नाही. भ्रष्टाचार समोर येईल म्हणूनच हा पळपुटेपणा […]
पुन्हा लॉकडाऊन?… नियम न पाळल्यास कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केल्या ‘ह्या’ सूचना
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याविरोधात तक्रार… चौकशीची मागणी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबतची माहिती लपवली. प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली असता ती पूर्णसत्य नाही, याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडे सोमवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे. त्यांनी दडवलेल्या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली […]
राज्यसरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय, जाणून घ्या
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी तुकाई उपसासिंचन योजनेसह चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्या बैठकीत घेण्यात आले. या अंतर्गत राज्यात ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम’ राबवत बंधारे, तलाव दुरुस्त करणे, सार्वजनिक बांधकामच्या ४२ कनिष्ठ अभियंत्यांचा सेवाकाळ नियमित करणे, नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीबाबत पूर्वीचा निर्णय मागे घेणे आणि तुकाई उपसा […]










