मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 5 मे पर्यंत स्थगिती दिली, तर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली. दिवाणी न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज […]
टॅग: mumbai high court
नवाब मलिकांना मोठा झटका! ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला आहे. […]
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ‘ती’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात आणि ईडी समन्स रद्द करण्याबाबत केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहून त्यात आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० […]
संजय राऊत यांच्याविरोधातील ‘ती’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, महिलेने केले होते गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर आरोप करत याचिका दाखल केलेली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राऊत यांनी अज्ञात व्यक्तिच्या माध्यमातून छळ केल्याचा आरोप सदर याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा […]
अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई हायकोर्टाकडून रद्द
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता हा जीआर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांच्याच आधारे केले जावेत, असे निर्देश मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि नववी, दहावीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल […]
विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा गुन्हाच; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्व निर्णय
नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी एखादी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंगच असल्याची महत्त्वपूर्व टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. २०११ साली अकोला येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीवर एका ४५ […]
लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, उच्च्य न्यायालयाची सूचना
मुंबई : लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च्य न्यायालयाने ही सूचना केली. वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च्य न्यायालयात सुनावणी पार […]
मुंबई उच्च न्यायालयाने गुलशन कुमार हत्याप्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली
मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये माफी मिळण्यास आरोपी पात्र […]
परमबीर सिंह यांना सोमवारपर्यंत अटक करू नये, हायकोर्टाचा मध्यरात्रीच्या सुनावणीत राज्य सरकारला आदेश
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर सोमवार (२४ मे) पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारला दिला. उन्हाळी सुटीकालीन न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारीही तब्बल १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या […]
तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारलं
मुंबई : परमबीर सिंहांच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा सवाल परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप भासत आहेत, असंही हायकोर्टानं म्हटलं. मुंबई […]








